तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मिळतेय 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज ! पहा सविस्तर माहिती

By News24

Published on:

Follow Us
anna saheb patil karj yojana

नमस्कार मित्रांनो राज्यातील तरुण युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने अण्णा साहेब पाटील कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेतून मराठा समाजातील युवकांना 10,000 रुपये ते 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

या कर्जाची खास गोष्ट म्हणजे शासनाने दिलेल्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. कर्जाची परतफेड अगदी सुलभ पद्धतीने करावी लागेल, केवळ 10 रुपये प्रतिदिन या प्रमाणे. यामुळे छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना आर्थिक मदत मिळेल.

योजना सुरू केल्यावर, जर 10,000 रुपये कर्जाची परतफेड केली, तर त्यानंतर 50,000 रुपये कर्ज घेता येईल. आणि त्या कर्जाची परतफेड 50 रुपये प्रतिदिन केली जाईल. हे कर्ज देखील नियमितपणे परतफेड केल्यावर, 1 लाख रुपये कर्ज उपलब्ध होईल आणि त्याची परतफेड 100 रुपये प्रतिदिन प्रमाणे करावी लागेल.

या योजनेचा उद्देश मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत देणे आहे. यामुळे ते आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रात स्थिर होऊ शकतात.

योजनेच्या लाभासाठी अर्ज अण्णा साहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून करावा लागेल. यावेळी कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा 45 वर्षांवरून वाढवून 60 वर्ष करण्यात आली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेचे प्रतिबंध कमी झाले आहेत.

योजनेंमुळे तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य दिशा मिळेल.

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.